Shruti Vilas Kadam
पावसाळ्यात उघड्यावर ठेवलेल्या खाद्यपदार्थांमध्ये जंतू आणि बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात.
या काळात पालेभाज्यांमध्ये माती, जंतू आणि कीटक असण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या नीट धुवून किंवा शिजवूनच खाव्यात.
भजी, वडे, समोसे यांसारखे पदार्थ चविष्ट असले तरी ते पचनावर ताण आणतात आणि अॅसिडिटी किंवा अपचनाचा त्रास वाढवू शकतात.
बाहेर कापून ठेवलेल्या फळांमध्ये जंतू वाढू शकतात. नेहमी ताजी आणि स्वतः सोलून खाल्लेले फळच खाणे योग्य.
पावसाळा हा अनेक माशांच्या प्रजननाचा काळ असतो. या काळात काही समुद्री खाद्यपदार्थ दूषित असण्याची शक्यता वाढते.
अतिथंड पदार्थांमुळे घसा दुखणे, सर्दी आणि खोकल्याचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे कोमट किंवा गरम पेये पिणे अधिक फायदेशीर ठरते.
पावसाळ्यात अन्न लवकर खराब होण्याची शक्यता असते. शिळ्या अन्नामध्ये जीवाणू वाढू शकतात, त्यामुळे नेहमी ताजे आणि स्वच्छ अन्नच खावे.