Shreya Maskar
पावसातून आल्यावर ओला रेनकोट, शर्ट, पँट, अंतर्वस्त्रे आणि विशेषतः ओले मोजे, बूट काढा. घरातील दमटपणा आणि बुरशीची वाढ रोखण्यासाठी ओले कपडे थेट कपडे धुण्याच्या टोपलीत (लॉन्ड्रीमध्ये) टाका.
पावसाच्या पाण्यात वातावरणातील प्रदूषके, धूळ आणि बॅक्टेरिया जमा होतात. कोमट पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा पूर्णपणे स्वच्छ होते.कोमट पाण्यामुळे थंडीचा प्रभाव कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारते.
साबण वापरून पाय आणि पायांच्या बोटांकडे विशेष लक्ष द्या. जर मुले साचलेल्या डबक्यांतून चालली असतील, तर पायांच्या बोटांमधील बुरशीजन्य संसर्गाची समस्या उद्भवू शकते. पावसात जास्त भिजला असाल तर केस देखील धुवा.
टाळू ओला राहिल्यास शरीर लवकर थंड पडते आणि नाक बंद होणे किंवा सर्दी होणे यांसारखे त्रास होऊ शकतात. त्यामुळे केस धुतल्यावर त्वरित कोरडे करा.
काखेचा भाग, मान, पायांच्या बोटांमधील जागा पूर्णपणे कोरड्या करा. या भागांत ओलावा राहिल्यास त्वचेवर घर्षणामुळे पुरळ उठणे आणि बुरशीजन्य संसर्ग यांसारख्या समस्या सहज उद्भवू शकतात.
कपडे बदलल्यानंतर लगेचच त्यांना साबणाने हात धुवायला सांगा किंवा सॅनिटायझर वापरायला द्या. पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरून आलेले जंतू निघून जाण्यास मदत होते.आंघोळीनंतर मुलांना कोरडे आणि सैल सुती कपडे घाला, जे उरलेला घाम शोषून घेतात.
पावसातून भिजून आल्यावर मुलांना गरमागरम शरीराला ऊब देणारे पदार्थ खाऊ घाला. त्यांना गरम सूप, कोमट दूध किंवा कोमट पाणी द्या. पावसात भिजल्यानंतर लगेचच त्यांना फ्रीजमधील पेये, आईस्क्रीम किंवा साखरेचे पदार्थ देण्यापासून दूर ठेवा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.