Manasvi Choudhary
पायात पैंजण घालणे केवळ श्रृंगारच नाही तर आरोग्याच्या आणि मानसिक दृष्टीकोनातून महत्वाचे आहे.
हिंदू धर्मात पायात पैंजण घालण्याला विशेष महत्व आहे. पायात पैंजण घातल्याने केवळ पायाचे सौंदर्य नाही तर तुमचं नशीब देखील बदलतं.
ज्योतिषशास्त्रानुसार, पायात पैंजण घालण्याचे काही नियम आहेत ते या वेबस्टोरीच्या माध्यमातून जाणून घेऊया.
पायात पैंजण घातल्याने केवळ सौभाग्य लाभत नाहीतर मानसिक शांती, वैवाहिक आनंद आणि आर्थिक स्थिती सुधारते.
पायात चांदीचे पैंजण घातले जातात चांदीला चंद्राचा धातू मानला जातो जो मन, भावना आणि शांतीशी संबंधित आहे.
लोखंड, पितळ किंवा इतर कोणत्याही धातूपासून बनवलेले पैंजण पायात चुकूनही घालू नये. तुटलेले किंवा खराब झालेले पैंजण कधीही घालू नका.
शास्त्रानुसार, तुटलेले पैंजण नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते यामुळे तुमच्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
सोन्याचे पैंजण घालणे टाळले पाहिडे यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते. एका पायात पैंजण घालणे अशुभ मानले जाते यामुळे शरीराचे संतुलन बदलते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.