Shreya Maskar
मटार भात किंवा पुलाव बनवण्यासाठी बासमती तांदूळ, हिरवे मटार, कांदा, टोमॅटो, तेल, हिरव्या भाज्या, पनीर, मका इत्यादी साहित्य लागते.
हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, खडे मसाले, हळद, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर इत्यादी मसाले लागतात.
मटार भात बनवण्यासाठी सर्वप्रथम बासमती तांदूळ स्वच्छ धुवून १५-२० मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर तांदूळ ३० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा.
पॅनमध्ये तूप गरम करून त्यात खडे मसाले टाकून फोडणी द्या. खडे मसाल्यांना सुगंध आणि तेल सुटू लागल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो हलका गुलाबी होईपर्यंत परतावा.
त्यानंतर हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, हिरवे मटार घालून मध्यम आचेवर परतवा. तुम्ही यात बटाट्याचे छोटे काप देखील टाकू शकता.
त्यानंतर हळद, गरम मसाला आणि मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करा. यात भिजवलेले तांदूळ घालून हलक्या हाताने मिक्स करा. त्यावर 2 कप पाणी घाला.
आता १०-१५ मिनिटे भात चांगला शिजवून घ्या. यात तुम्ही काजू, पनीर आणि हिगव्यागार भाज्या टाकू शकता. काजू पुलावमध्ये टाकण्याआधी तुपात परतून घ्या.
दही, काकडीची कोशिंबीर, लोणचे, पापडसोबत गरमागरम, चटपटीत मटार भात किंवा पुलावाचा आस्वाद घ्या. तुमचे पोट भरेल.