Shraddha Thik
हिंदू धर्मात लग्न आणि त्यासंबंधित चालीरीतींना खूप महत्त्व दिले जाते. त्यांचे स्वतःचे महत्त्व आहे आणि त्यामागे अनेक कारणे दडलेली आहेत.
लग्नापूर्वी वधू-वराच्या हातावर हळदकुंड बांधली जाते हे तुम्ही पाहिले असेलच. चला जाणून घेऊया त्याचे महत्त्व.
अनेक वर्षांपासून परंपरा आहे की, लग्नापूर्वी वधू-वराला हळदकुंड बांधली जाते. हिंदू धर्मात हे अत्यंत शुभ मानले जाते.
कोणत्याही शुभ कार्यात किंवा लग्नसोहळ्यात हळदीला विशेष स्थान आहे.
कोणतीही नकारात्मक ऊर्जा तिच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून वधू-वराला हळदकुंड बांधली जाते.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, वधू-वराला हळदकुंड बांधणे शुभ असते आणि असे केल्याने त्यांच्या जीवनात नकारात्मक शक्ती निघून, तसेच आनंद कायम राहतो.
लग्नापूर्वी केले जाणारे हे विधी वधू आणि वर यांच्यातील नाते दृढ करतात. यामुळे दोघांमध्ये गोडवा आणि प्रेम टिकून राहते.
लग्न सोहळ्यात हळदीचा समावेश केला जातो, कारण ते समृद्धीचे प्रतीक मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी टिकून राहण्यास मदत होते.