Shreya Maskar
सातारा जिल्ह्यात जावळीच्या घनदाट जंगलात सुमारे ४,०५४ फूट उंचीवर मकरंदगड किल्ला वसलेला आहे. हा एक डोंगरावरील किल्ला आहे.
जावळीचा प्रदेश जिंकताना १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मकरंदगड किल्ल्याचा विकास किंवा पुनर्बांधणी केली.
मकरंदगड किल्ल्याला दोन शिखरे आहेत. मधुशिखर (पश्चिम शिखर- 'मधुगड') आणि मकरंदगड (पूर्व शिखर) त्यांना जोडणारी एक धार (कटक) आहे.
विविध कालखंडांत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात राहिला. किल्ल्याला नक्की भेट द्या.
मकरंदगड किल्ल्याने जावळीच्या घनदाट जंगलात प्रतापगड आणि वासोटा किल्ला यांच्यातील धोरणात्मक संदेशवहन आणि सामरिक दुवा म्हणून त्याने काम केले.
मकरंदगड किल्ला ज्याला अनेकदा मधु मकरंदगड असेही बोले जाते. तुम्ही जर पहिल्यांदा ट्रेकिंगचा अनुभव घेत असाल तर या किल्ल्याला नक्की भेट द्या.
मुंबई ते साताऱ्यापर्यंत ट्रेनने प्रवास करा. त्यानंतर मकरंदगड किल्ल्यावर जाण्यासाठी घोणसपूर आणि हातलोट ही दोन पायथ्याची गावे आहेत. स्टेशनपासून या गावांपर्यंत रिक्षाने प्रवास करा.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.