Maharashtra Tourism: शांत आणि थंड ठिकाणी फिरण्याचा प्लान करताय? मग रत्नागिरीमधील 'हे' हिडन जेम ठरेल बेस्ट ऑप्शन

Surabhi Jayashree Jagdish

रत्नागिरी

रत्नागिरी हा जिल्हा कोकणातील असून, तो आपल्या सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि आंबा बागांसाठी ओळखला जातो.

माचाळ

रत्नागिरीजवळ एक कमी प्रसिद्ध असलेलं पण सुंदर ठिकाण आहे, ज्याला 'माचाळ' म्हणतात.

लांजा

माचाळ हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात आहे. हे ठिकाण रत्नागिरी शहरापासून सुमारे ५०-६० किलोमीटर अंतरावर आहे.

थंड वातावरण

माचाळ हे ठिकाण त्याच्या उंचीमुळे आणि वर्षभर थंड असलेल्या आल्हाददायक हवामानामुळे 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात इथलं सौंदर्य पूर्णपणे बहरलेलं असतं.

शांतता

माचाळच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे. निसर्गप्रेमी आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

धबधबे

पावसाळ्याच्या दिवसांत इथं अनेक छोटे-मोठे धबधबे तयार होतात, जे पर्यटकांना आकर्षित करतात.

ट्रेकिंग

डोंगरमाथ्यावर असल्याने इथून आजूबाजूच्या दऱ्या आणि गावांचं दृश्य दिसतं. त्यामुळे ट्रेकिंगसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे.

उत्तम पर्याय

समुद्रकिनाऱ्यासोबतच डोंगराळ भागाचा अनुभव घ्यायचा असेल, तर माचाळ हे एक उत्तम पर्याय आहे.

सौरमालेतील सर्वात थंड तापमान असलेला ग्रह कोणता?

coldest temperature | saam tv
येथे क्लिक करा