Bharat Jadhav
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी साम्राज्याशी निगडीत बारा किल्ल्यांना युनेस्को'तर्फे जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला. यात या किल्ल्याचा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात असलेला साल्हेर किल्ला मराठा साम्राज्यातील सर्वात महत्त्वाचा किल्ला आहे.
गडाच्या शिखरावर परशुरामाचे प्राचीन दगडी मंदिर आहे. गडावर गंगासागर तलाव आणि अनेक नैसर्गिक गुहादेखील आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी चार मुख्य प्रवेशद्वारे आहेत. त्यांची नावे गणेश, हनुमान, कोकण, आणि त्र्यंबक दरवाजा. सालोटा किल्ला देखील पाहण्यासाराखा आहे.
समुद्रसपाटीपासून उंची १५६७ मीटर( सुमारे ५,३०० फूट). कळसुबाई शिखरानंतर सर्वात उंच आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक उत्तुंग व देशातील क्रमांक दोनचा उंच दुर्ग. वाघांबे दरवाजाकडे जातांना १६ कोरीव लेणी. मात्र त्यात मूर्ती-शिल्प नाहीत.
रामायणातील संजिवनी बूटी आणताना हनुमानाने हा डोंगर उचलला होता, अशी अख्यायिका आहे. तसेच भगवान परशुराम यांनीही येथे तपश्चर्या केली होती, असेही मानले जाते.
फेब्रुवारी १६७२ मध्ये मराठा साम्राज्य आणि मुघल साम्राज्य यांच्यात युद्ध झाले. हे मराठ्यांचे मुघलांविरुद्धचे पहिलेच मोठे आणि समोरासमोर युद्ध झाले होते. ज्यामध्ये मराठ्यांनी मुघलांचा दारुण पराभव केला. मराठे पहिल्यांदा मैदानी लढाई लढले.
शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यातील साल्हेर आणि मुल्हेर हे किल्ले जिंकले होते. हे किल्ले परत मिळवण्यासाठी मुघल सम्राट औरंगजेबाने इखलास खान आणि बहलोल खान यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २० ते ४० हजारांची मोठी फौज युद्धासाठी पाठवली होती.
सरसेनापती प्रतापराव गुजर यांना वरघाटातून आणि पेशवे मोरोपंत पिंगळे यांना कोकणातून साल्हेरकडे मुघलांवर दुतर्फा हल्ला करण्यासाठी पाठवले. या युद्धात मराठ्यांचा ऐतिहासिक आणि निर्णायक विजय झाला.