Alisha Khedekar
भारताचं राष्ट्रीय फुल कमळ आहे. सौंदर्य, पवित्रता आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून कमळाला विशेष महत्त्व आहे.
कमळ चिखलात उमलतं, पण त्याच्या पाकळ्यांवर चिखलाचा डाग राहत नाही. त्यामुळे ते शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं.
भारतीय संस्कृतीत कमळाला हजारो वर्षांपासून महत्त्व आहे. धार्मिक विधी, कला आणि साहित्यातही कमळाचा उल्लेख आढळतो.
हिंदू धर्मात लक्ष्मी आणि सरस्वतीसह अनेक देवी-देवतांच्या चित्रणात कमळाला महत्त्वाचं स्थान दिलं जातं.
कमळाची पानं पाण्यावर तरंगतात, तर सुंदर फुलं पाण्याच्या वर उमलतात. त्याचा हा देखावा खास आकर्षक असतो.
सौंदर्यापासून अध्यात्मापर्यंत कमळाचं महत्त्व मोठं आहे. म्हणूनच भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांमध्ये कमळाला मानाचं स्थान मिळालं आहे.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा