Alisha Khedekar
चपाती आरोग्यदायी असली तरी प्रमाण जास्त झाल्यास दिवसातील एकूण कॅलरी वाढू शकतात आणि वजन कमी व्हायला वेळ लागू शकतो.
चपातीमध्ये कार्बोहायड्रेट असतात. डाएटमध्ये प्रमाणाचा समतोल बिघडल्यास वजन कमी करण्याचे प्रयत्न अपेक्षेइतके परिणामकारक ठरत नाहीत.
रिफाइंड किंवा कमी फायबरच्या पीठापासून बनवलेल्या चपातीमुळे रक्तातील साखर तुलनेने वेगाने वाढू शकते.
डाएट करताना चपाती पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. तुमच्या गरजेनुसार एक-दोन चपाती पुरेशा ठरू शकतात.
संपूर्ण गव्हाचे पीठ वापरल्यास फायबर मिळते आणि पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास मदत होऊ शकते.
वजन कमी करण्यासाठी चपाती बंद करण्यापेक्षा तिचे प्रमाण, पीठ, सोबतचे पदार्थ आणि संपूर्ण दिवसातील कॅलरी महत्त्वाच्या आहेत.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा