Manasvi Choudhary
लोकसभा निवडणुकीचा निकाल काल ४ जून रोजी जाहीर झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रिटींनी निवडणूक लढवून विजय मिळवला आहे.
अभिनेत्री कंगना रणौत यांनी पहिल्यांदाच प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे.
कंगणा रणौत या मंडी मतदारसंघातून काँग्रेसच्या विरोधात उभ्या होत्या.
शत्रुघ्न सिन्हा यांनी पश्चिम बंगाल आसनोल मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
अभिनेत्री हेमा मालिनी या मथुरा मतदारसंघातून प्रंचड मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.
रामायण मालिकेतील रामाची भूमिका साकारलेले अरूण गोविल हे मेरठमधून विजयी झाले आहेत.त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती.
भोजपुरी अभिनेते रवि किशन गोरखपूरमधून विजयी झाले आहेत.
केरळमधील त्रिशूर मतदारसंघातून अभिनेते सुरेश गोपी ७४, ६८६ मतांनी विजयी झाले आहेत.