Siddhi Hande
प्रभू श्रीरामांचे संपूर्ण जीवन सामर्थ्य व त्यांचे प्रेम आणि जीवनातील त्यांच्या कार्यासाठी ओळखले जाते. संतुलन, संयम, सत्य, आज्ञापालन यांसारखे श्रीारामांचे गुण आपण आत्मसात करायला हवेत.
श्रीराम नेहमीच सत्य आणि न्यायासाठी लढले. त्यांनी जनतेला नेहमी न्याय मिळवून दिला
प्रभू श्रीराम कधीच आपल्या कर्तव्यात कमी पडले नाही. कुटुंब, बायको, भाऊ आणि जनतेप्रती असलेली सर्व कर्तव्य त्यांनी पार पाडली.
श्रीरामांनी जेव्हा वनवास भोगला तेव्हा त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आले. या सर्व प्रसंगाना त्यांनी धीराने तोंड दिले.
श्रीरामांच्या प्रेमाची कथा तर सर्वांनाच माहित आहे. पत्नी सीता आणि बंधू भरत यांच्यावर असलेल्या प्रेमाच्या गोष्टी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.
श्रीरामांनी दुःखी, गरजूंना मदत केली त्यांच्यावर दया दाखवली.
श्रीराम हे शांत आणि संयमी होते. सीतेच्या अपहरणानंतर त्यांनी सर्व गोष्टी शांतता आणि संयमाने हँडल केल्या.
श्रीराम यांनी स्वतः वर विश्वास ठेवला अन् प्रत्येक कठीण प्रसंगाला तोंड दिले.
श्रीरामांनी आपला मित्र सुग्रीव आणि हनुमानावर विश्वास ठेवला. त्यांच्या मदतीने पत्नी सीतेला रावणाच्या तावडीतून सोडवले.
प्रत्येक परिस्थितीत त्यांनी आपल्या सहकार्यांना, प्रजेला मार्गदर्शन केले.
श्रीरामांनी नेहमी आपल्या भावनांवर, रागावर नियंत्रण ठेवली. त्यांनी कधीच कोणत्या वाईट गोष्टी केल्या नाहीत.