Shreya Maskar
सकाळी नाश्त्याला रात्रीच्या उरलेल्या भातापासून खमंग आप्पे बनवा.
रात्रीच्या उरलेल्या भातापासून आप्पे बनवण्यासाठी भात, दही, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, धने, पाणी, रवा, टोमॅटो, कोबी, गाजर, शिमला मिरची, मीठ इत्यादी साहित्य लागते.
आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम उरलेला भात, दही, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि पाणी मिक्सरमध्ये टाकून पेस्ट तयार करावी.
पेस्ट जास्त पातळ आणि जास्त घट्ट होणार नाही याची काळजी घ्या.
बाऊलमध्ये रवा, चिरलेल्या भाज्या, कोबी, गाजर, शिमला मिरची, कोथिंबीर, टोमॅटो, मीठ आणि चाट मसाला घालून मिश्रण एकजीव करा.
आप्पे पात्राला तेल लावून मिश्रण त्यात भरा.
आप्पे दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.
पुदिन्याच्या चटणीसोबत खमंग आप्पे खा.