Shreya Maskar
उरलेल्या चपात्यांपासून बाकरवडी बनवण्यासाठी उरलेल्या चपात्या, बेसन, पाणी, चिंच – गुळाची चटणी , तेल आणि पांढरे तीळ इत्यादी साहित्य लागते.
उरलेल्या चपात्यांपासून बाकरवडी बनवण्यासाठी हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, हळद, मीठ, लाल मसाला, गरम मसाला आणि कोथिंबीर इत्यादी मसाले लागतात.
उरलेल्या चपात्यांपासून बाकरवडी बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरला हिरव्या मिरच्या, आलं, लसूण यांची पेस्ट तयार करा.
एका बाऊलमध्ये बेसन, पाणी, हळद, चवीनुसार मीठ, लाल मसाला, गरम मसाला, लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.
आता उरलेल्या चपात्यांवर चिंच -गुळाची चटणी व्यवस्थित लावून घ्या.
त्यावर बेसनाची तयार केलेली पेस्ट पसरवून पांढरे तीळ टाका.
त्यानंतर चपातीला गोलाकार आकारात रोल करून त्याचे तुकडे करा.
गरम तेलात तयार बाकरवडी खरपूस तळून घ्या.