Manasvi Choudhary
सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये अनेकांना आपल्या कामाच्या व्यापात जेवायला देखील वेळ नसतो. त्यामुळे अनेकजण जेवतच टाळतात
त्या सोबतच अनेकजण वजन वाढल्यामुळे रात्रीचं जेवण करत नाहीत. रात्री जर काही खाल्लं किंवा प्यायलो नाही तर, आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.
रात्रीचं जेवण न करता झोपल्यामुळे, प्रोटीन, अमिनो असिडच्या क्षमतेवर परिणाम होतो, सोबतच स्नायू देखील कमकुवत होतात.
सोबतच रात्री काहीही न खाल्ल्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी दिवसभर अशक्त आणि थकवा जाणवू शकतो.
रिकाम्यापोटी झोपल्यामुळे त्याचा परिणाम झोपेवर होतो आणि दुसऱ्या दिवशी आपली खूप चिडचिड होते.
रिकाम्यापोटी झोपल्यामुळे त्याचा थेट परिणाम आपल्या चयापचय संस्थेवर होतो. त्या सोबतच इन्सुलिन पातळीमध्ये वाढ होते आणि हाय कॉलेस्ट्रॉलची देखील समस्या उद्भवू शकते.
रात्री जेवण न केल्यास शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळत नाहीत यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते.