Shreya Maskar
रत्नागिरी हा महाराष्ट्राच्या कोकण विभागातील एक किनारपट्टीवरील जिल्हा असून, तो येथील उत्कृष्ट दर्जाच्या 'हापूस' (अल्फोन्सो) आंब्यांसाठी प्रसिद्ध आहे. गणपतीपुळेसारखे नयनरम्य समुद्रकिनारे येथे आहेत.
रत्नदुर्ग किल्लाला भगवती किल्ला असेही म्हणतात. ही १६ व्या शतकातील, घोड्याच्या नालेसारखा आकार असलेली एक किनारी दुर्ग-रचना आहे. अरबी समुद्राचे विहंगम दृश्य, भगवती देवीचे मंदिर हे येथील मुख्य आकर्षण आहे.
जयगड किल्ला कोकण प्रदेशात स्थित असलेला १६ व्या शतकातील एक जलदुर्ग आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शास्त्री नदी आणि अरबी समुद्र यांच्या संगमावरील एका कड्यावर जयगड किल्ला वसलेला आहे.
गोपाळगड किल्ला म्हणून ओळखला जाणारा अंजनवेल किल्ला हा १६ व्या शतकातील समुद्राभिमुख असा किल्ला आहे. जो रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात, अंजनवेल गावाजवळ स्थित आहे. वशिष्ठी नदी आणि दाभोळ बंदराच्या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्याच्या उद्देशाने हा किल्ला उभारण्यात आला होता.
बाणकोट किल्ला ज्याला हिम्मतगड किंवा फोर्ट व्हिक्टोरिया म्हणूनही ओळखले जाते. हा रत्नागिरी जिल्ह्यात, सावित्री नदीच्या मुखाशी वसलेला एक ऐतिहासिक सागरी किल्ला आहे.
कनकदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जवळ, हरनाई (हरणे) येथे स्थित एक सागरी तटबंदी आहे. अरबी समुद्रात घुसलेल्या एका लहान टेकडीवर वसलेला कनकदुर्ग किल्ला जवळच असलेल्या सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता.
पूर्णगड हा महाराष्ट्रातील रत्नागिरी शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर वसलेला एक प्राचीन आणि निसर्गरम्य सागरी किल्ला आहे. अरबी समुद्र आणि मुचकुंदी खाडी यांच्या संगमावरील एका टेकडीवर हा किल्ला वसलेला आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.