Shreya Maskar
मांडवी बीच आणि भाट्ये बीच हे महाराष्ट्रातील रत्नागिरीमधील प्रमुख काळ्या वाळूचे समुद्रकिनारे आहेत, जे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ज्वालामुखीय वाळू आणि मनमोहक निसर्गरम्यतेसाठी ओळखले जातात.
मांडवी बीच 'रत्नागिरीचे प्रवेशद्वार' म्हणून लोकप्रिय आहे.येथील काळी वाळू खनिज-समृद्ध ज्वालामुखीजन्य पदार्थांपासून तयार झाली आहे.
मांडवी बीच येथे नेहमीच गर्दी असते, उंटांची सफारी उपलब्ध आहे आणि हे शहर व राहीवाडा बंदराच्या अगदी जवळ आहे.
भाट्ये पुलाच्या पलीकडे असलेला हा समुद्रकिनारा त्याच्या लांब पट्ट्यासाठी, काळ्या वाळूसाठी आणि शांत परिसरासाठी प्रसिद्ध आहे.
रत्नागिरी येथे काळबादेवी बीच देखील आहे. सूर्यास्त पाहण्यासाठी संध्याकाळची वेळ उत्तम असते. निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करा.
मांडवी बीच आणि भाट्ये बीच सुरूच्या झाडांनी वेढलेले आहे. संध्याकाळच्या फेरफटका, स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि समुद्राच्या विस्मयकारक दृश्यांसाठी येथे अनेकदा गर्दी असते.
गणपतीपुळे बीच, आरे-वारे बीच, रत्नादुर्ग किल्ला, जयगड किल्ला, सावतकडा धबधबा ही रत्नागिरीतील प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.