Ratnagiri Fort : रत्नागिरीतील ऐतिहासिक ठिकाण, पावसाळ्यात मित्रांसोबत 'या' किल्ल्यावर करा भटकंती

Shreya Maskar

कोकण

कोकणात रत्नागिरी येथे 'विजयाचा किल्ला' म्हणून ओळखला जाणारा जयगड किल्ला वसलेला आहे. कोकणात गेल्यावर येथे फॅमिलीसोबत एक ट्रिप नक्कीच प्लान करा.

Konkan | pinterest

जयगड किल्ला

जयगड किल्ला १६ व्या शतकातील एक सागरी किल्ला आहे. विजापूरच्या सुलतानशाहीने बांधलेला हा किल्ला शास्त्री नदी आणि अरबी समुद्र यांच्या संगमावर एका उंच कड्यावर वसलेला आहे.

Jaigad Fort | google

किल्ल्याचे महत्त्व

१८१८ मध्ये ब्रिटिशांच्या ताब्यात जाण्यापूर्वी जयगड किल्ला मराठा नौदलाचा एक महत्त्वाचा तळ आणि संरक्षणात्मकदृष्ट्या अत्यंत मोक्याचा किल्ला ठरला होता.

The meaning of the fort | google

इतिहास

जयगड किल्ला मराठा साम्राज्यातील नौदलाचे महान सरसेनापती कान्होजी आंग्रे यांचे प्रमुख केंद्र बनला.

History | google

किल्ल्याचा आकार

जयगड किल्ला २५० फूट उंच कड्यावर १३ एकर परिसरात पसरलेला सागरी किल्ला आहे. या किल्ल्याची रचना नैसर्गिक द्वीपकल्पाच्या आकारानुसार केली गेली असून, यात वरच्या बाजूला एक मजबूत बालेकिल्ला, तटबंदी असलेली खालची संरक्षण फळी, २४ बुरूज आणि जमिनीकडील बाजूला खंदक यांचा समावेश आहे.

The size of the fort | google

निसर्ग सौंदर्य

जयगड किल्ल्याच्या परिसरात गणपतीचे एक छोटेसे मंदिर आहे. जयगड किल्ल्यावरून अरबी समुद्राचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Beauty of nature | google

कसं जावं?

जयगड किल्ल्याला जाण्यासाठी मुंबईहून रत्नागिरीपर्यंत रेल्वेने प्रवास करा. पुढे रेल्वे स्टेशनपासून एसटी किंवा बसने प्रवास करा.

how to go | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : मराठा साम्राज्याचा अभिमान! 'तळेगाव'जवळ लपलाय ऐतिहासिक किल्ला, पावसाळ्यात करा भटकंती

Talegaon Fort | saam tv
येथे क्लिक करा...