Shreya Maskar
रत्नागिरीपासून सुमारे ६० किमी अंतरावर मार्लेश्वर बीच वसलेला आहे. पावसाळ्यात याचे सौंदर्य खुलते. येथे उंच आणि हिरव्यागार दरीतून कोसळणारा धबधबा पाहता येतो. येथे भगवान शंकराचे गुहा-मंदिरही आहे.
सावडाव धबधबा चिपळूणजवळ आहे. हा धबधबा जवळपास ७० मीटर उंचीवरून कोसळतो. तुम्ही येथे वीकेंडला मित्रांसोबत ट्रिप प्लान करू शकता.
रत्नागिरीपासून सुमारे ६० किमी अंतरावर खोरनिनको धरण आहे. मातीचे धरण उंच-सखल टेकड्यांनी वेढलेले आहे. मुसळधार पावसात येथील पाण्याचे प्रवाह पायऱ्यांसारख्या रचनेवरून खाली ओसंडून वाहतात, ज्यामुळे हे दृश्य अत्यंत नयनरम्य बनते.
थिबा पॅलेस ब्रिटिश सरकारने 1910 मध्ये बांधला होता. तिसऱ्या अँग्लो-बर्मी युद्धानंतर म्यानमारचा (पूर्वीचा बर्मा) शेवटचा सम्राट राजा थिबाव मिन यांचे अधिकृत निवासस्थान आणि नजरकैदेचे ठिकाण म्हणून हे बांधले गेले.
शास्त्री नदी अरबी समुद्राला मिळते, अशा एका कड्यावर जयगड किल्ला वसलेला आहे. किल्ल्याची प्राचीन तटबंदी भक्कम आहे. जवळच्या दीपगृहाचे (लाईटहाऊसचे) धुक्यातील दृश्य मनाला भुरळ घालते.
मांडवी बीच 'रत्नागिरीचे प्रवेशद्वार' म्हणून ओळखला जातो. संध्याकाळच्या फेरफटक्यासाठी येथे नक्की जा. येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर आंबा घाट आहे. पावसाळ्यात रोड ट्रिपासाठी हे बेस्ट लोकेशन आहे. दाट धुके आणि कड्यांवरून खाली कोसळणारे धबधबे पाहून तुम्ही वेडे व्हाल.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.