Shreya Maskar
कोकणातील जयगड किल्ला हा १६ व्या शतकातील एक सागरी किल्ला आहे, तो शास्त्री नदी आणि अरबी समुद्र यांच्या संगमाकडे पाहणाऱ्या एका कड्यावर वसलेला आहे.
जयगड किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळेपासून साधारणपणे २० किमी अंतरावर आहे. त्यामुळे गणपतीपुळे येथे गेल्यावर या ऐतिहासिक ठिकाणाला नक्की भेट द्या.
जयगड किल्ला, विजयाचा किल्ला म्हणूनही ओळखला जातो. हा किल्ला मूळतः विजापूर सल्तनत (आदिलशाही घराण्याने) 16 व्या शतकात बांधला होता.
शिवकाळात जयगड किल्ला एक मोक्याचा मराठा नौदल गड होता. कोकण किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी प्रख्यात ॲडमिरल कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखालील मराठा नौदल ताफ्यासाठी हा किल्ला महत्त्वाचा तळ होता.
रत्नागिरी स्टेशनला उतरून तुम्ही पुढे एसटी बसेस किंवा खाजगी टॅक्सीने जयगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचाल. गणपतीपुळेवरून जयगड किल्ल्यासाठी टॅक्सी किंवा खासगी वाहनांद्वारे १९ किमीचे अंतर अवघ्या ३० मिनिटांत गाठता येते.
श्री गणपतीपुळे मंदिर हे 400 वर्ष जुने, स्वयंभू भगवान गणेशाच्या अखंड मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर हे मंदिर वसलेले आहे.
प्राचीन, पांढरी वाळू, शांत वातावरण यासाठी गणपतीपुळे प्रसिद्ध आहे. तुम्ही येथे बोटिंगचा आनंद घेऊ शकता. समुद्रकिनारी गणपतीपुळे मंदिर असल्यामुळे येथील वातावरण मंगलमय असते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.