ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्याच्या काळात प्रत्येकाला गावकडच्या चुलीवर बनवलेल्या जेवणाची चव आवडू लागली आहे.
अनेकदा चुलीवरच्या जेवणात आस्वाद घेण्यासाठी अनेकजण शहरात निर्माण झालेल्या ढाब्यावर जाताना दिसतात.
मात्र हल्लीच्या तरुण मंडळीना चवदार आणि चमचमीत खाद्यपदार्थ खाण्यास आवडतात.
तुम्ही कधी विचार केला का? चुलीवर बनवलेले पदार्थ इतके रुचकर आणि चवदार कसे लागतात.
गावाकडे आपल्याला भाजी बनवताना प्रत्येक भाजीही शेतातून ताजी काढून बनवता येते,त्यामुळेही जेवणाची चव वाढते.
शहरात मिळणारे धान्य जास्त तर धान्यात कीटकनाशके मिसळलेली असतात,मात्र गावाकडे याचे प्रमाण नसते.
अनेकाद आपण म्हणतो गावाकडील पाण्याची चव वेगळी असते,त्याचा परिणाम ही जेवणाच्या चवीवर होतो.
गावाकडे जेवण बनवताना विहिरीचे किंवा नदीतल्या पाण्याचा वापर केला जातो,ज्यात क्षार आणि खनिज मोठ्या प्रमाणात असतात.