ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उद्या म्हणजे रविवारी भारतातील शेवटचे चंद्रग्रहण लागणार आहे.
हे चंद्रग्रहण देशातील सर्व राज्यातून दिसणार आहे.
चंद्रग्रहण रविवारी रात्री ८ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल.
पण ज्योतिषशास्त्रानूसार चंद्रग्रहणाचा सुतक काळ ठराविक वेळेच्या काही तासांआधी सुरू होईल.
हा सुतक काळ चंद्रग्रहणाच्या वेळेच्या ९ तासांआधी सुरू होईल.
म्हणजेच दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी सुरू होईल.
रविवारी सुरू होणारे चंद्रग्रहण राहुच्या शतभिषा नक्षत्रावर सुरू होईल आणि गुरूच्या पूर्वभाद्रपद नक्षत्रावर याचे समापन होईल.
हे चंद्रग्रह भारतासह यूरोप, एशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलँड आणि अमेरिकेच्या काही भागांमधूनही दिसेल.