Manasvi Choudhary
हिंदू धर्मामध्ये पूजा करताना घंटी वाजवण्याला विशेष महत्त्व आहे. असे केल्यास आजूबाजूचे वातावरण शुद्ध होते.
परंतु देवाऱ्यात घंटी वाजवताना काही नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
देवघरातील घंटी वाजवल्यावर जो ध्वनी ऐकू येतो, त्यामुळे मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
देवघरात पूजा करताना डाव्या हाताने घंटी वाजवणे शुभ मानले जाते आणि उजव्या हाताने आरती करावी.
आरती करताना घंटी वाजणे थांबणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पूजा पूर्ण झाल्यावरच घंटी हातातून खाली ठेवावी.
घरात नियमित घंटी वाजवल्यास त्या ध्वनीमुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरातील वातावरण शुद्ध राहते.
डाव्या हाताने देवघरातील घंटी वाजवल्यास लोकांचा देवावरील विश्वास अजून दृढ होतो.
मंदिरात प्रवेश करताना देखील तुम्ही डाव्या हाताने घंटी वाजवावी. हे खूप पवित्र मानले जाते.
सदर लेख सामान्य माहितीसाठी आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.