Manasvi Choudhary
शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण म्हणजेच ब्लड शुगर नियत्रंणात असणे आवश्यक असते.
रक्तातील साखरेचे प्रमाण साधारणत:७० एमजी/डीएलपेक्षा कमी असते तेव्हा ती कमी झाल्याचे समजते.
रक्तातील साखर कमी असल्यास अशक्तपणा, चक्कर येणे, खूप भूक लागणे, अंग थरथरणे, घाम येणे, भीती वाटणे अशी लक्षणे दिसतात.
साखरेचे प्रमाण जेव्हा २०० एमजी/डिएलपेक्षा जास्त असते.तेव्हा रक्तातील साखर जास्त झाली आहे असे समजते.
सतत तहान लागणे तसेच वारंवार लघवीला जाणे हे एक लक्षण आहे.
थोडेफार जरी काम केले तरी थकवा येणे याशिवाय डोळ्यांना अंधूक दिसणे ही लक्षणे आहेत.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.