ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टोमॅटोमुळे जेवणाला नैसर्गिक आंबट-गोड चव मिळते. भाजी, आमटी, उसळ, चटणी अशा पदार्थांची चव तो लगेच वाढवतो.
जेवणात टोमॅटो घातल्यामुळे तिखटपणा आणि मसाल्यांचा कडूपणा बॅलेन्स राहतो. त्यामुळे कोणताही पदार्थ अधिक चविष्ट लागतो.
टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते, जे हृदयाचे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. ज्यांना हृदयाचे आजार आहेत त्यांनी नियमित टोमॅटो सेवन करावे.
टोमॅटोमुळे जेवणात आणि पदार्थाला लालसर सुंदर रंग येतो. त्यामुळे जेवण अधिक सुंदर दिसते आणि खाण्याची इच्छा वाढते.
टोमॅटो पचनक्रिया सुधारतो. त्यामुळे जेवण जड वाटत नाही आणि पचायला मदत होते.
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन C असते, जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि आजारांपासून संरक्षण करते.
खिचडी, भाजी, आमटी, पुलाव, सूप, सॉस, कोशिंबीर अशा अनेक पदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर सहज करता येतो.
आरोग्य, रंग आणि चव यासाठी टोमॅटो जेवणात महत्त्वाचा घटक मानला जातो. म्हणूनच रोजच्या जेवणात टोमॅटो वापरणे फायदेशीर ठरते.