Manasvi Choudhary
स्वयंपाकघरात काम करताना आपल्याकडून कधीकधी छोटीशी चूक होते आणि संपूर्ण मेहनत वाया जाते. भाजी किंवा कोणताही पदार्थ बनवताना त्यात चुकून मीठ, तिखट जास्त होणे किंवा भाजी जास्त शिजून करपणे या समस्या होतात.
भाजी जरा जरी करपली की तिचा जळलेला वास संपूर्ण पदार्थाला येतो आणि चव बिघडते.
पदार्थ करपला की तो खाण्यायोग्य नसतो अशावेळी आपण तो फेकून देतो. मात्र आता आम्ही तुम्हाला अशी सोपी ट्रिक सांगणार आहोत जी तुम्ही भाजी करपली की वापरू शकता.
एखादा पदार्थ करपला की तुम्ही सर्वातआधी त्यावरचा भाग काढून टाका. भांड्याच्या तळाला चिकटलेला, करपलेला भाग ढवळू नका कारण जळलेला वास संपूर्ण भाजीला येऊ शकतो.
भाजी दुसऱ्या भांड्यात काढल्यानंतर त्यात १ ते २ चमचे ताजे दही घाला आणि मंद आचेवर १-२ मिनिटे भाजी पुन्हा गरम करा. दह्याचा आंबटपणा आणि मलईदार पोत जळलेली चव संतुलित करतो.
तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, करपलेल्या भाज्यांचा वास आणि चव कमी करण्यासाठी दही फायदेशीर ठरू शकते.
भाजी खूप करपली असेल तर ती पूर्णत: नीट होऊ शकत नाही. हलकी करपलेल्या भाजीची चव सुधारण्यासाठी ही युक्ती तुम्ही करू शकता.