Alisha Khedekar
उरलेला भात फ्रिजमध्ये ठेवणे योग्य असले तरी तो योग्य तापमानात साठवणे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते.
शिजवलेल्या भातात ‘बॅसिलस सेरियस’ जिवाणूंचे बीजाणू राहू शकतात, जे चुकीच्या साठवणुकीमुळे वाढून अन्न विषबाधा करू शकतात.
भात शिजवल्यानंतर तो दोन तासांपेक्षा जास्त वेळ बाहेर ठेवू नये, अन्यथा जिवाणू वाढण्याचा धोका वाढतो.
फ्रिजमधील कमी तापमान जिवाणूंची वाढ मंदावते, त्यामुळे भात खाण्यायोग्य राहण्यास मदत होते.
फ्रिजमधील भात खाण्यापूर्वी तो वाफ येईपर्यंत व्यवस्थित गरम केल्यास आरोग्याचा धोका कमी होतो.
एकाच भाताला पुन्हा पुन्हा गरम केल्याने त्याची गुणवत्ता कमी होऊ शकते आणि आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता वाढते.
थंड भात थेट खाण्यापूर्वी तो योग्य प्रकारे साठवला गेला आहे का, याची खात्री करणे आवश्यक असते.
चुकीच्या पद्धतीने ठेवलेला किंवा जास्त वेळ बाहेर राहिलेला भात पोटदुखी, उलट्या आणि अन्न विषबाधा निर्माण करू शकतो.