Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रात जलतत्वाला विशेष महत्व आहे. किचनचे सिंक हे पाण्याशी संबंधित स्थान मानले जाते त्यामुळे याठिकाणी चुकीच्या वस्तू ठेवल्याने जलतत्वावर परिणाम होतो.
अनेकजण किचन सिंकच्या खाली कचऱ्याचा डबा ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार ही अत्यंत वाईट गोष्ट आहे यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. किचन सिंकच्या खाली ओलावा टिकून राहतो त्यामुळे तेथे ठेवलेल्या वस्तू लवकर खराब होतात.
किचन सिंक खाली कचरा साचल्याने स्वयंपाकघरात नकारात्मक येते. अस्वस्थता वाटते. घरातील ऊर्जा शुद्ध ठेवण्यासाठी कचराकुंड्या स्वयंपाकघराबाहेर किंवा योग्य ठिकाणी ठेवाव्यात.
किचन सिंकखाली झाडू ठेवणे हा वास्तदोष मानले जाते. शास्त्रानुसार, झाडू देवी लक्ष्मीशी संबधित आहे. चुकीच्या ठिकाणी झाडू ठेवल्याने लक्ष्मी नाराज होऊ शकते.
अनेक घरांमध्ये सिंकखाली घाणेरड्या , वापरलेल्या अस्वच्छ भांड्याचा ढीग साचलेला असतो यामुळे वास्तूदोष निर्माण होतो. दमट जागेत भांडी ठेवल्याने जिवाणूंची वाढ होते.
सिंकखाली द्रव, डिटर्जंट, केमिकल्स किंवा इतर सफाईचे सामान ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार, साफसफाईचे साहित्य पाण्याच्या ठिकाणापासून तसेच स्वयंपाकघरापासून दूर ठेवले पाहिजे.
किचनच्या सिंकखाली जुने, प्लास्टिकचे डबे, तुटलेली भांडी ठेवणे टाळा. या वस्तूंमुळे घरात पसारा येतो आणि नकारात्मक ऊर्जा वाढते.
घरात चुकीच्या वस्तू ठेवल्याने नकारात्मकता, मानसिक ताण, आर्थिक अस्थिरता, कौटुंबिक वाद वाढू शकतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.