Shreya Maskar
कोकणात गणपतीला अनेक लोक गावी गेले आहेत. गणपतीची मनोभावे पूजा करून झाल्यावर कोकण फिरा. कोकणातील सुंदर गाव पाहायला विसरू नका.
महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात केळशी हे गाव वसलेले आहे. येथील केळशी बीच जगात भारी आहे.
केळशी बीच येथे पांढरी शुभ्र वाळू आणि स्वच्छ निळ्या पाण्याने नटलेला शांत व स्वच्छ समुद्रकिनारा आहे. येथे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात थंड वातावरण अनुभवता येते.
केळशी गाव अद्वितीय भौगोलिक वैशिष्ट्यासाठी म्हणजेच समुद्रकिनाऱ्यालगत तयार झालेल्या प्रचंड वाळूच्या टेकडीसाठी ओळखले जाते. केळशी हे कोकणची शान आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील केळशी गावात श्री आशापूरक सिद्धिविनायक महागणपती, केळशी आणि ऐतिहासिक केळशीतील महालक्ष्मी मंदिर ही दोन्ही प्रसिद्ध मंदिरे आहेत.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील वैशिष्ट्यपूर्ण अशा सुपारी, नारळ आणि आंब्याच्या दाट बागांनी हे गाव वेढलेले आहे. येथे तुम्हाला पावसाळ्यात निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळेल.
केळशी बीचला गेल्यावर बनाना राइडचा आनंद घेता येतो. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.