Bharat Jadhav
जर एखादा मित्र भावनिक आधारासाठी सतत तुमच्यावर अवलंबून असेल तर त्याचा तुमच्यावर परिणाम होईल.
जर एखाद्या मित्राला न सांगता घरी येण्याची सवय असेल. हे तुम्हाला ते आवडत नसेल तर तुम्ही ही गोष्ट त्याला समजावून सांगा.
तुमची मैत्री खरी आहे हे दाखवा, गरजेवेळी मित्राच्या मदतीला धावून जा.
तुमच्या सर्व मित्रांसोबत मोकळेपणाने बोलणे खूप महत्वाचे आहे. जेणेकरून तुमच्या नात्यात कोणतेही गैरसमज होणार नाहीत.
मैत्रीच्या नात्याचा आदर केला पाहिजे. मित्रांची वैयक्तिक माहिती कोणाला सांगू नये. त्याच्या कमतरतेवरुन त्याची मस्करी करू नये.
तुमच्या मित्राच्या गरजा ओळखा आणि त्यांचा आदर करा. तुम्हाला काही गोष्टी पटत नसल्यास बोलून व्यक्त व्हा.
अपराधीपणा शिवाय लोकांना नाही म्हणायला शिका. बरेच लोक मैत्रीतील प्रत्येक गोष्टीला हो म्हणतात. त्यामुळे त्यांची फसगत होते.
मैत्रीच्या अनमोल नात्याचा आदर करा. मैत्री दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश असतो हे समजून घ्या.
मध्यरात्री रात्री बोलण्यासाठी मित्रांना फोन करू नये.
येथे क्लिक करा