Shreya Maskar
करंजी हा महाराष्ट्रातील गोड पदार्थ आहे.
करंजी बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, गूळ, ओले खोबरे, वेलची पूड आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.
करंजी बनवण्यासाठी सर्वप्रथम तांदळाच्या पिठात गरम पाणी आणि मीठ घालून पीठ मळून घ्या.
पॅनमध्ये तूप टाकून त्यात गूळ आणि ओले खोबरे मिक्स करून सारण तयार करा.
आता मळलेल्या पिठाचे गोळे करून त्याची गोल पारी लाटा.
पारीमध्ये तयार सारण भरून त्याला मोदकाचा किंवा करंजीसारखा आकार द्या.
पॅनमध्ये तेल गरम करून करंजी खरपूस तळून घ्या.
तुम्ही सारणात वेलची पूड आणि जायफळ पूड देखील घालू शकता.