Siddhi Hande
वन डे रिटर्न ट्रीपसाठी कुठे जायचं असा प्रश्न अनेकांना पडलेला असते. तुम्ही मुंबईजवळील या ठिकाणांना भेट देऊ शकतात.
मुंबईवरुन कल्याणला पोहचण्यासाठी फक्त पाऊण तास लागतो. तिथून तुम्ही अनेक ठिकाणी फिरु शकतात.
कल्याण उल्हास नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी किल्ला बांधण्याचे आदेश दिले होते. या किल्ल्यावर मंदिरदेखील आहे.
कल्याणमधील विष्णू मंदिर खूप प्रसिद्ध आहे. लेंडी तलावामध्ये श्री विष्णूंची मूर्ती सापडली त्यानंतर येथे मंदिर बांधण्यात आले.
कल्याणच्या पश्चिमेकडे असलेल्या बिर्ला मंदिराला तुम्ही भेट देऊ शकतात. या मंदिरात विठ्ठलाची मूर्ती आहे. स्थापत्यकलेचा हा उत्तम नमूना आहे.
कल्याणवरुन तुम्ही अवघ्या अर्ध्या तासात कर्जतला जाऊ शकतात. कर्जतला तुम्हाला निसर्ग सानिध्यात फिरण्यासाठी अनेक जागा आहेत. तिथे तुम्ही रिसॉर्ट किंवा विला बुक करु शकतात.
भिवंडी तालुक्यात लोणाड लेणी आहे. कल्याणजवळील टेकडीवर ही गुहा आहे. या गुहेचे रुपांतर खंडेश्वरी देवी मंदिरात झाले आहे.