Shreya Maskar
कास तलाव हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वसलेले एक शांत आणि मानवनिर्मित जलाशय आहे. पावसाळ्यात येथील सौंदर्य आणखी खुलून येते. त्यामुळे एक फॅमिली ट्रिप येथे नक्कीच प्लान करा.
कास तलाव हे जगप्रसिद्ध कास पठारापासून अवघ्या ३ ते ५ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. त्यामुळे एका ट्रिपमध्ये ही दोन्ही ठिकाणे फिरा. कास तलाव हे १८७५ मध्ये बांधलेले असून युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहे.
कास तलाव प्रामुख्याने सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या विहंगम दृश्यांसाठी, धुक्याने वेढलेल्या निसर्गरम्य परिसरासाठी आणि पक्षी निरीक्षणासाठी ओळखले जाते.
कास तलावाच्या भोवती दाट जंगले, टेकड्या आणि खोल दऱ्या आहेत. येथील तलावाचा काठ अतिशय शांत आणि सपाट आहे, जिथे तुम्ही निवांत वेळ घालवू शकतात.
मुंबईहून सातारापर्यंत रेल्वेने प्रवास करा. पुढे साताऱ्या स्टेशनला उतरून रिक्षा, खाजगी टॅक्सी किंवा एसटीने प्रवास करा.
कास पठाराला 'फुलांच्या दरी' म्हणूनही ओळखले जाते. हा परिसर पावसाळा आणि हिवाळ्यात रंगीबेरंगी फुलांनी बहरून जातो. डोळ्यांचे पारणे फेडणारा नजारा पाहायला मिळतो.
कास तलावाजवळ भांबवली वजराई धबधबा आणि ठोसेघर धबधबा ही सुंदर ठिकाणे आहे. येथे तुम्ही फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.