Shruti Vilas Kadam
एमजीआर हे भारतातील पहिले अभिनेते होते ज्यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले. ते तमिळनाडूचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले.
जयललिता या सुपरहिट अभिनेत्री होत्या आणि नंतर तमिळनाडूच्या सहा वेळा मुख्यमंत्री बनल्या. त्यांचा प्रभाव दीर्घकाळ टिकला.
एनटीआर यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांत काम करून नंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून तीन कार्यकाळ पूर्ण केले.
एमजीआर यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांनीही काही काळासाठी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली.
दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक चिरंजीवी हे देखील राजकारणात सक्रिय राहिले आहेत आणि त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणूनही काम केले आहे.
चिरंजीवी यांचे धाकटे बंधू पवन कल्याण हे सध्या आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत आणि त्याच वेळी ते चित्रपटसृष्टीतही सक्रिय आहेत.
आजही विजय यांसारखे कलाकार राजकारणात प्रवेश करत असून तेही भविष्यात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जात आहेत
Face Care: चेहऱ्याला थंडावा आणि नॅचरल ग्लो हवा असेल; तर स्किनवर लावा ही घरगुती स्वस्त पेस्ट