Saam Tv
मंगळागौरी व्रत हे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी केले जाणारे माता पार्वतीचे व्रत आहे. विशेषत: नवविवाहित महिला हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या दीर्घायुष्यासाठी करतात.
पौराणिक कथेनुसार, देवी पार्वतीमुळे हे व्रत सुरू झाले. देवी मंगळागौरीची श्रद्धेने पूजा केल्यास वैवाहिक जीवनतील अडचणी दूर होतात. अशी मान्यता आहे.
सकाळी स्नान करून कपडे घालून देवीची स्थापना करावी. हळद - कुंकू, फुले,फळे अक्षता, नैवेद्य, विड्याची पाने, पंचामृत, दिवा अर्पण करावा. मंगळागौरी व्रताच्या कथेचे वाचन करावे.
प्रदेशानुसार नैवेद्य हा बदलतो. पुरणपोळी, खीर, मोदक, लाडू, पंचखाद्य, फळे आणि गोड पदार्थ देवीला अर्पण केले जातात .
पूजेनंतर महिलांमध्ये फुगडी, झिम्मा, पिंगा, उखाणे , गाणी आणि पारंपरिक खेळ खेळण्याची परंपरा आहे. मंगळागौरीचे खेळ खेळल्याने शरीराचा देखील चांगला व्यायाम होतो.
हे व्रत अखंड सौभाग्य, पतीचे आरोग्य, कुटुंबाचे सुख-समृद्धी आणि मानसिक शांततेसाठी केले जाते. अनेक ठिकाणी हे व्रत एकदा सुरू केल्यास सलग ५ वर्षे करण्याची प्रथा आहे.
मंगळागौरी हा केवळ धार्मिक विधी नसून स्त्रियांचा उत्सव आहे. एकोपा, परंपरा, संस्कृती आणि कौटुंबिक नात्यांना मजबूत करणारा सण आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.