Shruti Vilas Kadam
साखरेच्या तुलनेत गुळात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे खनिज घटक आढळतात, जे शरीरासाठी फायदेशीर ठरतात.
जेवणानंतर थोडा गूळ खाल्ल्याने पचन चांगले होते. त्यामुळे गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
गुळात लोहाचे प्रमाण असल्याने शरीरातील रक्तनिर्मिती सुधारण्यास मदत होते. त्यामुळे अशक्तपणा कमी होऊ शकतो.
गूळ शरीरात हळूहळू ऊर्जा निर्माण करतो. त्यामुळे अचानक साखर वाढण्याऐवजी शरीर अधिक काळ सक्रिय राहते.
गुळातील अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे हंगामी आजारांपासून संरक्षण मिळू शकते.
गूळ शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतो असे मानले जाते. विशेषतः यकृत स्वच्छ ठेवण्यासाठी तो उपयुक्त मानला जातो.
गूळ आणि तूप किंवा आले एकत्र खाल्ल्यास घसा खवखवणे, सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम मिळण्यास मदत होते.