Sakshi Sunil Jadhav
अनेक लोक आरोग्याच्या दृष्टीने साखरेचा वापर कमी करून गुळाला जास्त प्राधान्य देतात. गूळ हा नैसर्गिक गोडवा देणारा पदार्थ आहे. त्यात अनेक पोषक घटक असतात.
क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट रक्षिता मेहरा यांच्या मते, रोजच्या आहारात साखरेऐवजी गूळ वापरल्यास पचनशक्ती सुधारते. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात आणि रोगप्रतिकारक शक्तीला मोठा फायदा होतो. तसेच गूळ हळूहळू ऊर्जा देत असल्याने अचानक होणारे ब्लड शुगर स्पाइक्स टळतात आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
गूळ पचन एन्झाईम्स सक्रिय करतो आणि अपचन, गॅस, फुगणे यासारख्या समस्या कमी होतात.
शरीरातील टॉक्सिन्स नैसर्गिकरित्या बाहेर काढण्यास गूळ उपयुक्त आहे. म्हणून याचे मुबलक प्रमाणात केलेले सेवन योग्य ठरते.
गुळातील अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स शरीराची इम्युनिटी मजबूत करतात. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
गूळ रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो आणि हार्ट हेल्थ सुधारतो.
गूळ हळूहळू ऊर्जा सोडतो. त्यामुळे जास्त खाण्याची इच्छा कमी होते आणि कॅलरी कंट्रोल राहते.
साखरेप्रमाणे त्वरित स्पाइक न होता ऊर्जा सतत मिळत राहते. गूळ रक्त शुद्ध करण्यास मदत करतो व हिमोग्लोबिन वाढवतो.
कॅल्शियम, फॉस्फरस सारखे खनिज पदार्थ हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. हिवाळ्यात गूळ शरीरातील उष्णता टिकवून ठेवतो आणि रोगांपासून संरक्षण देतो.