ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारताचा राष्ट्रीय ध्वज, तिरंगा, हे देशाच्या एकतेचे आणि अभिमानाचे प्रतीक आहे. त्याचा आदर करण्यासाठी, काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
तिरंग्याच्या वापरासाठी आणि प्रदर्शनासाठी फ्लॅग कोड ऑफ इंडिया २००२ मध्ये नियम बनवण्यात आले आहेत. त्यांचे उल्लंघन केल्यास शिक्षा होऊ शकते.
तिरंग्याचा भगवा रंग नेहमी वर असावा आणि हिरवा रंग खाली असावा. तो उलटा फडकवणे हा ध्वजाचा अपमान आहे.
कोणत्याही परिस्थितीत फाटलेला ध्वज फडकावू नये. असा ध्वज कचऱ्यात न फेकता आदरपूर्वक नष्ट करावा.
तिरंगा जमिनीवर ठेवू नये किंवा पाण्यात बुडवू नये. तो नेहमी उंच आणि आदरणीय ठिकाणी ठेवावा. तसेच तिरंगा असलेले कपडे किंवा पडदे सजावट म्हणून वापरू नये. हा ध्वजाचा अपमान मानला जातो.
तिरंगा नेहमी इतर ध्वजांपेक्षा उंच फडकवला पाहिजे. तो इतर कोणत्याही ध्वजाखाली ठेवू नये, तसेच. योग्य प्रकाश नसल्यास तिरंगा सूर्यास्तानंतर उतरवावा.
राष्ट्रीय ध्वज कार, टेबल किंवा वैयक्तिक वस्तूंवर सजावट म्हणून वापरू नये.