ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रोजच्या जीवनात आपण अनेक गोड पदार्थांचे सेवन करत असतो. चहा असो की कॉफी, किंवा मिठाई या सर्व पदार्थांमध्ये साखर असते.
जास्त प्रमाणात गोड खाल्ल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
जर तुम्ही एक महिना साखरेचे सेवन करणे टाळले तर ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहील.
साखरमध्ये जास्त कॅलरीज असतात, आणि कॅलरीजमुळे वजन वाढते. जर साखर खाणं टाळले तर वजन कमी होण्यास मदत होते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी साखर शक्यतो कमी प्रमाणात खा. एक महिना साखर न खाल्ल्यास रोगप्रतिकाशक्ती वाढते.
३० दिवस साखर न खाल्ल्यास तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारु शकते. जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या असेल तर साखर खाणं टाळा.