Surabhi Jayashree Jagdish
हा अमरावती जिल्ह्यातील मेळघाटाच्या डोंगराळ भागातील एक सुंदर धबधबा आहे.
पावसाळ्यात या ठिकाणी वाहणारे धबधबे, हिरवीगार दरी आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करते.
मुक्तागिरीध्ये ५२ जैन मंदिरे असून त्यापैकी काही डोंगरावर आणि काही डोंगरकड्याखाली आहेत.
धार्मिक स्थळ असल्यामुळे याठिकाणी शांतता आणि अध्यात्मिक वातावरण अनुभवता येतं.
सर्वप्रथम अमरावती शहर गाठा. अमरावतीहून अचलपूरमार्गे चिखलदरा रोडने पुढे जा.
अचलपूरपासून मुक्तागिरी सुमारे १५ किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याने थेट मुक्तागिरी मंदिर परिसर गाठता येतो. मंदिरापासून धबधबा काही मिनिटांच्या चालीनंतर दिसतो.
मुंबईहून अमरावती सुमारे ६३० ते ६५० किलोमीटर आहे
अमरावतीहून मुक्तागिरी सुमारे ६० किलोमीटर आहे. एकूण अंदाजे ६९० ते ७१० किलोमीटर अंतर तुम्हाला पार करावं लागेल.