Manasvi Choudhary
आजही अनेकजण मानत असलेल्या अंधश्रद्धांपैकी एक म्हणजे 'मांजर रस्ता ओलांडणे'. अनेकजण रस्त्यावर चालत असताना मांजर आडवी गेली, तर काही वेळ थांबतात किंवा रस्ता बदलतात.
मात्र, सुप्रसिद्ध संत श्री प्रेमानंद महाराज यांनी आपल्या प्रवचनातून सकारात्मक विचार करण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की, मांजर रस्त्यावर आडवी गेली तर अशुभ नसते.
प्रेमानंद महाराज सांगतात की, तुमच्या वाटेत मांजर आडवी गेली किंवा तुम्ही बाहेर पडताना कोणी शिंकले, तर त्याने तुमच्या कामात काहीही फरक पडत नाही. या सर्व केवळ मानवी मनाच्या कल्पना आणि भ्रम आहेत.
महाराजांच्या मते, जगातील सर्वात मोठी आणि खरी शक्ती देवाच्या नामाचे स्मरण करण्यात आहे. जर एखादी व्यक्ती देवाचे नाव घेऊन, त्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून घराबाहेर पडली, तर जगातील कोणतीही वाईट शक्ती किंवा अपशकुन तिला स्पर्शही करू शकत नाही.
महाराजांनी अत्यंत सोप्या भाषेत सांगितले आहे की, "जर तुमच्या रस्त्यातून १०० ते २०० मांजरी जरी आडव्या गेल्या, तरी तुमचे काहीही वाईट घडणार नाही." त्यामुळे अशा निरर्थक गोष्टींमुळे मनात भीती बाळगणे पूर्णपणे चुकीचे आहे.
जेव्हा तुमचा विचार सकारात्मक असतो आणि देवावर विश्वास असतो, तेव्हा कोणतीही वाईट शक्ती किंवा परिस्थिती तुमची प्रगती रोखू शकत नाही.
प्रेमानंद महाराजांचा हा सल्ला अशा लोकांसाठी आहे जे नकारात्मक विचार करतात. येथे दिलेली माहिती ही पूर्णपणे खरी किंवा अचूक असल्याचा आमचा दावा नाही. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.