Siddhi Hande
टीम इंडियाने टी २० वर्ल्डकपवर आपले नाव कोरले आहे. हा भारतासाठी सर्वात मोठा विजय आहे.
अहमदाबादमध्ये अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करुन भारताने टी-२० वर्ल्डकप उंचावला आहे.
आता टीम इंडियावर बीसीसीआयने बक्षीसाचा वर्षाव केला आहे. विश्वविजेत्या संघाला मोठी रक्कम दिली आहे.
बीसीसीआयने टीम इंडियासाठी तब्बल १३१ कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे.
याआधी २०२४ मध्ये जेव्हा टीम इंडियाने टी-२० वर्ल्डकप जिंकला होता तेव्हा १२५ कोटींचे बक्षीस दिले होते.
यावेळी बक्षीसात ६ कोटींची वाढ केली आहे. आता संघाला १३१ कोटी रुपये मिळणार आहे.
हे बक्षीस फक्त खेळाडूंसाठी नव्हे तर स्पोर्ट स्टाफ आणि निवड समितीच्या सदस्यांनाही मिळणार आहे.
टीम इंडियाला आयसीसीकडूनही चांगलीच रक्कम मिळाली आहे. विश्वविजेत्या संघाला २७.५ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे.