Shreya Maskar
आपण आयुष्यात अशा अनेक गोष्टी करतो ज्यांचे आपल्याला नंतर वाईट वाटते. कधीकधी, आपण त्या निर्णयांसाठी इतरांची माफी देखील मागतो. पण आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतात ज्यांसाठी कधीही कोणाचीही माफी मागू नये. अन्यथा लोक तुम्हाला कमकुवत मनाचे समजतील.
तुम्हाला जर स्वतःचे आयुष्य प्रायव्हेट ठेवायचे असेल. तुम्ही जर स्वतःला मर्यादा घातल्या असतील, तर यासाठी कोणाचीही कधीही माफी मागू नका.
सर्वजण आपले स्वतःचे जीवन जगतो. त्यामुळे ते आपल्याला हवे तसे जगावे. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करत माफी मागून स्वतःला लाजवू नका.
तुम्ही भूतकाळात चुका किंवा चुकीचे निर्णय घेतले असतील तर त्याबद्दल भविष्यात दुःखी होऊ नका. यासाठी तुम्हाला कोणाची माफी मागण्याची गरज नाही. कारण प्रत्येकजण त्यांच्या भूतकाळातील निर्णय आणि चुकांमधून शिकतो.
तुम्ही जर स्वतःसाठी वेळ काढत असाल. तसेच स्वतःच्या कामात व्यस्त असाल तर कधीच SORRY बोलू नका. कारण प्रत्येकाने स्वतःला वेळ देणे गरजेचे आहे. आयुष्यात स्वतःला पहिले स्थान द्या. स्वतःसाठी जगा.
प्रत्येकाची भावना व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. काही लोक रडतात, काही रागवतात, काही भांडतात , तर काही दुःखी राहतात. त्यामुळे तुमच्या भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीवर कधीही कोणाचीही माफी मागू नका. तुम्हाला राग किंवा अस्वस्थ वाटत असेल, तर स्वतःला शांत करा, वेळ द्या.
तुम्ही आयुष्यात सर्वात आधी स्वतःसाठी जगा. दुसऱ्यांना तुमच्या आयुष्याचे निर्णय घेऊ देऊ नका. आयुष्यात काही चांगले-वाईट झाले, तर त्यासाठी दुसऱ्याला सॉरी बोलू नका. तुमचे आयुष्य तुम्हाला हवे तसे जगा आणि स्वतःचे निर्णय घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.