ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळा सुरु होताच अनेक आरोग्याच्या समस्या जाणवतात.
पावसाच्या पाण्यात जास्त वेळ गेल्याने अनेकांच्या पायांना चिखल्या झालेल्या तुम्ही पाहिल असेल.
चला तर पाहूयात चिखल्याचा त्रास होऊ नये म्हणून कोणती दक्षता घ्या.
पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो चपला वापरु नये. असे केल्याने रस्त्यावरील खराब पाण्यामुळे चिखल्याचा त्रास होऊ शकतो.
जास्त वेळ पावसाच्या साचलेल्या पाण्यात राहिल्यास पायांना चिखल्याचा त्रास होऊ शकतो.
पायांच्या बोटांच्या मध्य भागी चिखल्या होतात.यामुळे यावर योग्य वेळेत योग्य ते उपचार करावेत.
पावसाच्या पाण्यातून घरात आल्यावर गरम पाण्याने पाय कायम धुवावेत.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.