Surabhi Jayashree Jagdish
भारतात जवळजवळ प्रत्येक घरात सकाळची सुरुवात एका कप चहाने होते. सकाळची ही सवय अनेकांसाठी दिवसाची ऊर्जा मानली जाते.
अनेक लोक पेपर वाचताना चहा पिणं अधिक पसंत करतात. वाचनासोबत चहा घेतल्याने त्यांना आराम आणि एकाग्रता वाटतं. ही सवय अनेक वर्षांपासून कायम आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का की सकाळचा हा एक कप चहा अनेक नुकसान करू शकतो. लोक हे नुकसान लक्षात न घेता रोज चहा पितात. त्यामुळे त्याचा शरीरावर होणारा परिणाम समजून घेणं महत्त्वाचं आहे.
सकाळी उठताच चहा प्यायल्याने शरीर डीहायड्रेट होऊ शकते. रात्रभर झोपेमुळे शरीरात पाण्याची कमतरता असते. अशावेळी चहा घेतल्याने पाण्याऐवजी निर्जलीकरण वाढते.
सकाळी चहा प्यायल्याने शरीरातील ऍसिड लेवल वाढू शकतो. यामुळे गॅस्ट्रिक इरिटेशन, जळजळ आणि अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते. संवेदनशील पोट असणाऱ्यांसाठी ही स्थिती अधिक त्रासदायक ठरू शकते.
चहामध्ये असलेलं कॅफीन स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलचे प्रमाण वाढवू शकतो. यामुळे मनावर स्ट्रेस येऊ शकतो आणि चिडचिड होऊ शकते. दीर्घकाळ असे झाल्यास मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
साखर आणि चहामधील ऍसिड एकत्र येऊन दातांच्या एनॅमलला कमजोर करतात. यामुळे दातांची संरक्षणात्मक आवरण हळूहळू नष्ट होऊ शकते. त्याचा परिणाम म्हणून दात संवेदनशील होतात.
सतत चहा घेतल्याने हाडेदेखील कमजोर होऊ शकतात. चहातील काही घटक शरीरातून कॅल्शियमची घट होण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे हळूहळू हाडांची ताकद कमी होऊ शकते.