ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चहा कॉफी हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
प्रत्येकजण चहा किंवा कॉफीचे सेवन करतो. चहा कॉफीचे सेवन करण्याची एक योग्य वेळ असते.
चहा कॉफी दिवसातून ३-४ वेळा प्यायली जाते. परंतु हे शरीरासाठी हानिकारक आहे.
चहा कॉफी दिवसातून एक ते दोन वेळाच प्यायला हवी.
सकाळ आणि संध्याकाळी चहा किंवा कॉफीचे सेवन करावे.
सकाळी उठल्यावर उपाशी पोटी कधीच चहा पिऊ नये. यामुळे भूक लागत नाही.
सकाळी नाश्ता केल्यानंतर लगेच चहा पिऊ नये. किमान एका तासानंतर चहा प्यावा.
जेवल्यानंतर चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. जेवल्यानंतर २-३ तासांनी चहा-कॉफी प्यावे.
वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांशी संपर्क साधा.