Omkar Sonawane
चार जणांसाठी भात बनवायचा असल्यास 1 ते 2 ग्लास तांदूळ घ्या. ते परात किंवा मोठ्या भांड्यात ठेवा.
त्यामध्ये तांदूळ पूर्णपणे पाण्यात बुडतील इतके पाणी घाला. त्यानंतर हाताने तांदूळ हलक्या हाताने फिरवा. असे 30 सेकंदापर्यंत करा. यामुळे तांदळातील अतिरिक्त स्टार्च पाण्यात मिसळण्यास मदत होते.
पाणी पांढरे झाल्यावर ते हळूहळू काढून टाका. यावेळी तांदूळ खाली पडणार नाहीत, याची काळजी घ्या
पुन्हा एकदा तांदळामध्ये स्वच्छ पाणी घाला आणि तसाच पद्धतीने हलक्या हाताने धुवा. दोनवेळा तांदूळ धुतल्यानंतर त्यांना साधारण 10 ते 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा
चार जणांसाठी कुकरमध्ये 2 ग्लास तांदूळ शिजवत असाल, तर त्यामध्ये साधारण दीड ग्लास पाणी घाला. योग्य प्रमाणात पाणी वापरल्यास भात मोकळ आणि दाणेदार होईल.
तांदूळ भिजवलेले किंवा धुतलेले पाणी फेकून देण्याची घाई करू नका. या पाण्याचा केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर म्हणून वापर केला जाऊ शकतो.तसेच हे पाणी कुंडीतल्या झाडांनाही घालता येते.