माणूस किती दिवस उपाशी राहू शकतो, अन्नाशिवाय शरीराला ऊर्जा कशी मिळते?

Bharat Jadhav

अन्न-पाणी महत्त्वाचं

मानवी शरीरही एखाद्या यंत्राप्रमाणे कार्य करत असते. हे यंत्र चालवण्यासाठी अन्न आणि पाण्याची आवश्यकता असते. अन्न आणि पाण्याशिवाय शरीराला ऊर्जा मिळत नाही. अन्न आणि पाण्याशिवाय माणसाचा जीवही जाऊ शकतो.

अन्न पाण्याविना किती दिवस माणूस जगतो?

एखादी व्यक्ती अन्न न घेता नेमकी किती काळ जगू शकते आणि जेव्हा शरीराला अन्न किंवा पाणी मिळत नाही, तेव्हा ते कसे कार्य करते.

शरीराला ऊर्जा कशी मिळते?

लोक अनेकदा उपवास करतात, किंवा काही जण उपोषण करतात ते काही दिवस अन्न ग्रहण करत नाहीत. अशा परिस्थितीत, शरीराला ऊर्जा कशी मिळते? अन्न न घेता शरीर नेमकी ऊर्जा कशी मिळवते, हे आपण फरिदाबाद येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत बंगा यांच्याकडून जाणून घेऊ.

अन्न न घेता शरीराला ऊर्जा कशी मिळते?

जेव्हा शरीरात अन्न किंवा पाणी जात नाही, तेव्हा शरीर आपली ऊर्जा वापरण्याचा वेग कमी करते. हृदय, मेंदू आणि फुफ्फुसे यांच्यासाठी ऊर्जा उपलब्ध राहील याची खात्री करण्यासाठी, शरीर अत्यंत आवश्यक कार्यांना प्राधान्य देऊन ऊर्जेची बचत करण्यास सुरुवात करत असते.

पहिल्या २४ तासांत कोणतीही अडचण येत नाही

सुरुवातीच्या २४ तासांत ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी शरीराला विशेष कष्ट घ्यावे लागत नाही. याचे कारण म्हणजे यकृत आणि स्नायूंमध्ये ग्लुकोज आधीच साठवलेले असते. या काळात शरीराला कोणतीही मोठी अडचण येत नाही.

२४ तासांनंतर समस्या उद्भवते

डॉ. विनीत बंगा यांच्या मते २४ तासांनंतर गुंतागुंत सुरू होते, कारण यकृतामध्ये साठवलेले ग्लायकोजेन संपलेले असते. त्यानंतर, ऊर्जा मिळवण्यासाठी शरीर चरबीचे विघटन करण्यास सुरुवात करते.

दीर्घकाळ अन्न न मिळाल्यास काय होतं?

उपवासामुळे जेव्हा शरीराला अनेक दिवस अन्न किंवा पाणी मिळत नाही, तेव्हा ते पूर्णपणे 'आणीबाणीच्या स्थितीत' जात असते. स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी शरीर जुन्या किंवा खराब झालेल्या पेशींचे विघटन करून त्या वापरू लागते. या प्रक्रियेतून शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते.

हेही वाचा

येथे क्लिक करा

शिळ्या भातात काय प्रक्रिया होते? शरीरासाठी फायदेशीर असतं की नुकसानकारक?