Saam Tv
वजन कमी करण्यासाठी अनेकजण भात कमी करून चपाती खाण्यावर भर देतात. पण अस केल्याने खरच वजन कमी होत का?
वजन कमी करण्यासाठी भात कमी करून चपात्यांवर भर देऊ नका. चपात्यांमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज असल्याने चरबी आणखी वाढते.
गव्हामध्ये ग्लुकोन नावाचा घटक असतो. त्याचे प्रमाण जर जास्त झाले तर पोट फुगणे, अपचनाच्या समस्या वाढतात.
गव्हातील कार्बोहायड्रेट्स पचल्यावर त्याचे रूपांतर साखरेत होते. साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे डायबीटीझ असणाऱ्या लोकांनी चपात्या खाऊ नये. असे सांगितले जाते.
एकाच वेळी जास्त कार्बोहायड्रेट्स खाल्ल्याने शरीर जड पडते आणि आळस किंवा थकवा जाणवू लागतो.
दिवसभरात साधारण ३-५ चपात्या पुरेशा असतात. मात्र तुमच्या शरीराची गरज आणि आहारानुसार प्रमाण मागे- पुढे होऊ शकते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.