ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकजणांना जेवल्यानंतर थोडा वेळ फिरणे किंवा चालण्याची सवय असते.
जेवल्यानंतर चालण्यानंतर पचन क्रिया सुधारते, असे समजले जाते.
मात्र जेवल्यानंतर किती वेळ चालणे आरोग्यासाठी चांगले असते ते कोणालाच माहिती नसते.
चला तर जाणून घेऊयात जेवल्यानंतर किती वेळ शतपावली करावी ?
जेवल्यानंतर चालण्याने पोट फुगण किंवा गॅसेस होणे यांसारख्या समस्या दिसून येत नाही.
जेवल्यानंतर साधारण २५ ते ३० मिनिटे चालणे योग्य समजले जाते.
जेवल्यानंतर चालण्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.